May 11, 2019

भाषा-अस्त्राचा गजरा!


रशिया , फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन या देशांनी आपल्या भाषेला सॉफ्टपॉवर म्हणून सतत पुढे ठेवण्याचा केलेला प्रयत्न, त्यासाठी ते करत असलेली कल्चरल डिप्लोमसी या गोष्टी आपण भारतीयांनी शिकण्यासारख्या आहेत. कारण आपण आपल्या भाषांची आबाळ करतो. खरे तर आपल्या भाषेच्या प्रसार-संवर्धनातून आपला राष्ट्राभिमान, राष्ट्रहित जोपासलं जातं असतं. भाषा हे अस्त्र नाजूक असलं तरी ते तितकंच प्रभावीही असतं. या उद्देशाने १६ जून रोजी ‘संवर्धन’ या सेवाभावी संस्थेतर्फे मुंबईत संस्कृत भाषेविषयी एक परिसंवाद होतो आहे. त्यानिमित्ताने भाषिक हत्याराचे पैलू स्पष्ट करणारा हा लेख..

बोत्सन हे युरोपातल्या दक्षिण तिरोल या प्रदेशातले एक इवलेसे गाव आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी आणि इटलीच्या अगलबगल चिमटीत सापडलेलं. ते अधिकृतरीत्या येतं इटलीत, पण तेथील २५ टक्के लोक जर्मन वंशाचे- पर्यायाने जर्मन भाषिक आहेत.


तर या इटुकल्या-मिटुकल्या गावात येत्या २८ जुलैपासून चांगला आठवडाभर जर्मन या त्यांच्या मातृभाषेचा अपूर्व सोहळा साजरा होत आहे. १९६१पासून ते आजपर्यंत निरनिराळ्या जर्मन भाषिक प्रदेशांत हा सोहळा संपन्न होतो. २०१३च्या बोत्सनमधल्या या सोहळ्यात १०० देशांमधले अडीच हजार जर्मन भाषा प्रशिक्षक आणि जर्मनभाषातज्ज्ञ आमंत्रित म्हणून सहभागी होणार आहेत. जर्मन भाषा अधिकाधिक उत्तम तऱ्हेने शिकवण्यासाठी जगभरात चालू असणाऱ्या प्रयोगांना, उपक्रमांना एक व्यासपीठ मिळणार आहे. शिवाय जर्मन पाठय़पुस्तके तयार करणारे पाच-पन्नास प्रकाशक जगभरातल्या जर्मन प्रशिक्षकांशी संवाद साधणार आहेत. या सर्वाचा खर्च साडेसात लक्ष युरोच्या (अंदाजे सव्वापाच कोटी रुपये) घरात जाईल, असा आयोजकांचा अंदाज आहे. जर्मन भाषेचे संवर्धन आणि प्रसार यासाठी जर्मन सरकार साठीच्या दशकापासून जो अवाढव्य खर्च करत असते त्या हिमनगाचे हे अगदी शेंडय़ाएवढे उदाहरण. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात ८० टक्के बेचिराख झालेल्या या देशाने युद्धानंतर अवघ्या १६ वर्षांत आपल्या मातृभाषेच्या पद्धतशीर संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी ही एवढी थोरली आर्थिक गुंतवणूक आणि तरतूद किती दूरदृष्टीने केली असली पाहिजे!


आपल्याकडच्या ‘मातृदेवो भव’ या उक्तीतील ‘मातृ’ ही अशी जन्मदात्या भाषेपर्यंतही पोहोचवता येते हे पाहिल्यावर डोळ्यात पाणी येते. आपल्या घरातल्या प्रादेशिक भाषांच्या अक्षम्य आबाळीचा विरलेला पदर सारखा आठवत राहतो.


एकंदरीत आपल्या भारतीय मनात ‘ते विज्ञान’ आणि ‘ती भाषा’ यातले डावे-उजवे खोलवर रुतलेले आहे. गणित-सायन्स खरे! बाकी भाषा प्रावीण्य वगैरे म्हणजे एरवी आयुष्यात दुसरे काहीच जमत नसलेले लोक भाषाबिशा शिकतात असा प्रवाद फार वेळा दिसतो. त्यातही पुन्हा सत्तेची उतरंड आहे. त्यात इंग्रजी भाषा सर्वात वरच्या पायदंडीवर, तर प्रादेशिक भाषा, त्यांची आजी संस्कृत ही सगळ्यात खालच्या पायरीवर. मातृभाषांच्या या हेळसांडीमागे तशी कारणेही आहेत. शिक्षण संपल्यावर नोकरीची वेळ येते, त्या वेळी विज्ञान-तंत्रज्ञान हे कर्त्यां पुरुषासारखे काठी वाजवत ओटीवर प्रवेश करताना दिसतात. त्यांच्या चंचीत पैसे खुळखुळतात. मातृभाषा मात्र अंधाऱ्या स्वयंपाकघरात रात्रंदिवस खपणाऱ्या अन्नपूर्णेसारखी मना-संस्कारांची मशागत करत बसते. तिची मुकी माया कोणाला दिसत नाही, समजत नाही. मग तिचा कसला सोहळा करायचा?


इंग्रजीचा वाढता प्रभाव हा काही फक्त आपल्या भारतापुरता प्रश्न नाही. जगभरातल्या भाषांमध्ये तिचा चंचुप्रवेश सतत होत आहे. तरीही औद्योगिक क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर असलेले सर्व देश आपापली मातृभाषा कसोशीने जपताना दिसतात. इस्राएल, जर्मनी, स्कँडेनेव्हियातले देश, रशिया, कोरिया, जपान, चीन अशा सर्व देशांत शालेय आणि विद्यापीठीय शिक्षणाचे माध्यम त्यांची त्यांची मातृभाषा असते. इंग्रजी या मडमेला ते दिवाणखान्यात जरूर प्रवेश देतात. पण म्हणून आपले अंतर्गृह तिच्या ताब्यात देत नाहीत. या देशांतील मुले आपापल्या मातृभाषेत मोठी होतात. या मातृभाषा ज्ञानभाषा व्हाव्या म्हणून हे सर्व प्रगत देश त्यामध्ये प्रचंड आर्थिक गुंतवणूक करतात. माननीय यशवंतराव चव्हाण हेच तर सांगत होते आपल्याला! भारतीय भाषांनी त्वरेने बोलीभाषेतून ज्ञानभाषेत उत्क्रांत होणे महत्त्वाचे आहे म्हणून.


मातृभाषेचे सबलीकरण यातला भावनिक अनुबंधाचा भाग थोडा दूर ठेवू. त्यामागचे व्यवहाराचे आणि राजकीय दूरदृष्टीचे अस्तर मात्र आपण जरूर विचारात घेण्यासारखे आहे. आपापल्या भाषांचा जगभर प्रसार करू पाहणे हा आंतरराष्ट्रीय कल्चरल डिप्लोमसीचा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे.


एक डिप्लोमॅट म्हणजे मुत्सद्दी नेमका काय करतो? तर प्रथम सर्वाशी लांब-रुंद चर्चा करतो. सर्व बाजू ऐकून घेतो आणि मग विरोधी विचारांना मोठय़ा खुबीने आपल्या बाजूने वळवून घेतो. अगदी पट्टीचा मुत्सद्दी तर यापुढे चार-आठ पावले जातो. आपले विचार हेच सर्वात आदर्श विचार असे एक गारूड फार यशस्वीपणे तयार करतो.


गौरवर्णीयांनी ‘योगा’ वगैरे म्हटले की मग समूहांना घाऊक प्रमाणात योगविद्येकडे वळावेसे वाटते. धुणीभांडी करणारी माऊली पोटास चिमटा घेऊन आपल्या लेकाला ‘कॉन्व्हेंट’मध्ये घालते. त्यामुळे पुढे तो म्यानेजर झालाच जणू अशा भ्रमात जगते! ‘गोरी सत्रा गुण चोरी’ अशा म्हणी आणि वृत्ती तयार होतात. ताजवरच्या भीषण हल्ल्यात बीबीसी/ सीएनएन लावावेसे वाटते, दूरदर्शन नाही.


थोडक्यात समूहांचे ब्रेनवॉशिंग करण्याचे प्रमुख अस्त्र म्हणजे ही कल्चरल डिप्लोमसी. त्याची सुरुवात भाषेच्या प्रसारापासून होते. कारण शेवटी प्रत्येक संस्कृती अमुक एका भाषेतून विचार करत असते. ती भाषा इतर समूहांना गोड वाटली, आवडू लागली की, त्यातले आचार- विचार-संस्कारही आवडू लागतात. मग स्वत:ची मातृभाषा तोकडी वाटू लागते. स्वत:ची संस्कृती तोकडी वाटू लागते. इंग्रजांनी फार पूर्वीपासून ही काळजी घेतली. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान या देशांनी इंग्रजांचा कित्ता गिरवला. या क्लबात आता चीन दाखल झाला आहे. २०२० पर्यंत जगभरात चिनी भाषा आणि चिनी कल्चरचा प्रसार करणाऱ्या तब्बल १००० कन्फ्युशिअस इन्स्टिटय़ूट्स उभारण्याचा विडा या देशाने उचलला आहे. पैकी ५०० इन्स्टिटय़ूट कार्यरतही झाल्या आहेत. प्रत्येक इन्स्टिटय़ूटपाठी प्रतिवर्षी तब्बल ४ लाख डॉलर्स खर्च केले जातात.


आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या प्रांगणात याला ‘सॉफ्ट पॉवर’ असे नाव आहे. एखाद्या महाप्रचंड अभेद्य अशा शिळेवर अव्याहतपणे थेंब थेंब पाणी पडत राहिले तर ती कालांतराने भंगू शकते..अर्थात सुरुंग लावूनही ती भंगता येते. प्रत्येक देश स्वसंरक्षणासाठी अशा सुरुंगांची म्हणजे लष्करी तयारी करत असतो. त्याला नाव आहे हार्डपॉवर. ती दिसते. मोजता येते. अण्वस्त्रांच्या, रणगाडय़ांच्या संख्येमुळे तिचा दबदबा असतो; परंतु याच्याच जोडीला दूरदृष्टी असलेले देश सॉफ्टपॉवरसाठीही तितक्याच ताकदीनिशी पैशाची तजवीज करताना दिसतात. ही सॉफ्टपॉवर वाढवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातला सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपल्या भाषेचे सबलीकरण करणे. आणि मग ही सबला दूर दूर देशी पाठवून आपल्या संस्कृतीचे सबलीकरण करणे. म्हणजे काय? तर इतर सर्व जगवासीयांना जणू आपला ध्यास लावून देणे. मग जगभरातल्या अत्युच्च बुद्धिमत्तेला किंवा स्वस्त मजुरांना आपल्या देशाकडे खेचून आणण्यास फारसे कष्ट पडत नाहीत. शिवाय आपल्या उत्पादनांसाठी तेथील बाजारपेठ सहज काबीज करता येते ते वेगळे!


इतका दूरदृष्टीचा विचार आपण भारतीय कधी करणार? जन्मदात्यांनी स्त्री गर्भाची कळी खुडून टाकावी तशी भारतभरातल्या प्रादेशिक भाषांना आपण मरणकळा आणत आहोत. त्यांना सबला करून कल्चरल डिप्लोमसीसाठी दूरदेशी पाठवणे तर राहिले शतयोजने दूर!


गो. नी. दांडेकरांच्या ‘पडघवली’मध्ये व्यंकू खोत नावाचे एक पात्र आहे. हा व्यंकू खोत आंधळ्या भिऊआबाच्या तरण्या पत्नीसाठी- शारदेसाठी बंदरावरून येताना रोज एक भरगच्च गजरा आणतो. चांगला कलाबूत घातलेला. मग त्या बदल्यात तिचा भोग घेतो आणि शेवटी शारदेचे घर- आगार बघता बघता व्यंकू खोताच्या नावावर होते.


अशी असते सॉफ्टपॉवर आणि त्यातली कल्चरल डिप्लोमसी!


भारतीय शारदेच्या भाळी आंधळा भिऊआबाच लिहिला आहे का? 


पण लक्षात कोण घेतो!


वैशाली करमरकर 

कटी पतंग

स्वत:च्या संस्कृतीला श्रेष्ठ ठरविण्यासाठी इतर संस्कृतीतील लोकांची सांस्कृतिक नाळ कापण्याचा आणि त्यांना अधांतरी लटकवण्याचा उद्योग दीर्घ काळापासून सुरू आहे.


मांजा तुटलेला पतंग काही काळ दिशाहीन तरंगतो. नंतर तो एकतर कापणा:याच्या मुठीत येतो किंवा कुठेतरी अडकून फाटून जातो. स्वत:च्या संस्कृतीला श्रेष्ठ ठरविण्यासाठी इतर संस्कृतीतील लोकांची सांस्कृतिक नाळ कापण्याचा आणि त्यांना अधांतरी लटकवण्याचा उद्योग दीर्घ काळापासून सुरू आहे.

-----------------

गेल्या पंधरा-वीस दिवसात युरोपभर आणि इतरत्र फार अचंबित करणा:या घडामोडी घडत होत्या. त्या सर्व घडामोडी ‘सॉफ्ट पॉवर’ या विषयाच्या व्याप्तीला स्पर्श करणा:या आहेत, म्हणून त्याबद्दल उल्लेख जरुरीचा आहे -

1. जर्मनीमधे सर्व ज्यू लोकांना एक अपील करण्यात आले आहे. त्यांनी त्यांची ‘किप्पा’ नावाची तळहाताएवढी गोल टोपी जर्मनीत घालून फिरू नये. कारण त्यामुळे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. ‘किप्पा’ घालून फिरले आणि हल्ला झाला तर सरकार जबाबदार नाही, अशा कडक शब्दात ही ‘विनंती’ आहे.

2. ऑस्ट्रीयन सरकारने ‘इस्लामिक लॉ’ नावाचा एक नवीन कायदा केला आहे. ऑस्ट्रीयामधे सहा टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. आजवर त्यांच्यासाठी 1912 सालापासून अस्तित्वात असलेला कायदा लागू होता. तो रद्द करून दि. 25 फेब्रुवारीपासून आता हा नवीन कायदा मुस्लीम धर्मीयांना लागू होणार आहे. 

त्यानुसार मशिदींसाठी किंवा इमामांसाठी यापुढे परदेशातून पैसा आणण्यावर सक्तीची बंदी आणली आहे. मुस्लीम समाजाने यावर प्रचंड विरोध दर्शविला आहे. त्यांचे म्हणणो आहे की, सर्व ािश्चन आणि ज्यू धर्मीयांना ‘फॉरेन फंडिंग’ म्हणजे परदेशी पैशाची मदत कायदेशीरपणो शक्य आहे; मग आमच्यासाठी हा भेदभाव का?

3. डेन्मार्कमधील एका सांस्कृतिक केंद्रात एक स्वीडनचे आर्टिस्ट, फ्रान्सचे अॅम्बॅसीडर अशी बडी बडी मंडळी एका परिचर्चेसाठी जमलेली होती. चर्चेचा विषय धार्मिक स्वातंत्र्य, कलास्वातंत्र्य आणि मतस्वातंत्र्य असा होता. त्यावेळी या सांस्कृतिक केंद्रावर भीषण दहशतवादी हल्ला झाला. 

4. ब्रेमेन या उत्तर जर्मनीतील शहरात पोलिसांनी एका सांस्कृतिक केंद्रावर छापा घालून काही लोकांना अटक केली आहे आणि अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. या सांस्कृतिक केंद्राला सशस्त्र जर्मन पोलिसांनी घट्ट वेढा घातला आहे.

5. मोसूल या इराकमधील शहरात एका वास्तुसंग्रहालयावर भीषण हल्ला झाला. प्राचीन असीरीयन संस्कृतीची अनेक प्राचीन शिल्पे आणि पुतळे या ठिकाणी जतन केलेले होते. सहाव्या आणि सातव्या शतकातील अनेक मौल्यवान शिल्पे हल्लेखोरांच्या हातोडय़ाखाली येऊन चक्काचूर झाली. 

- वरील सर्व घडामोडी फक्त गेल्या काही दिवसातल्या आहेत. सर्व घडामोडींचा संबंध ‘संस्कृती’ या शब्दाशी जाऊन पोहोचणारा आहे. लष्करी तळावरील हल्ले ही गोष्ट समजण्यासारखी आहे. ती इतकी वर्षे प्रत्येक युद्धात अनुभवाला येत होती; परंतु सांस्कृतिक केंद्रे, वस्तुसंग्रहालये, पेहेरावातल्या सांस्कृतिक खुणा यावर हल्ला करण्यासारखे काय आहे? - असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

गेली तीनेक शतके ‘संस्कृती’ या संकल्पनेचा जगभर एखाद्या अस्त्रसारखा उपयोग केला गेलेला आहे. विशेषत: पाश्चात्त्यांकडून. 

चार्लस् डार्वीनने मांडलेल्या उत्क्रांतीवादाचे बोट धरत धरत 19व्या शतकाच्या पूर्वार्धात हरबर्ट स्पेन्सर या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने त्याची अजब निरीक्षणो हिरीरीने जगापुढे मांडायला सुरुवात केली. त्यांनी अठराव्या शतकातील सर्व संस्कृतींच्या आजवरच्या उत्क्रांतीचे किंवा प्रगतीचे आलेख मांडले. त्याने त्यासाठी तीन-चार निकष वापरले. ते निकष म्हणजे- एखाद्या संस्कृतीने केलेली आर्थिक प्रगती, तंत्रविज्ञानातील प्रगती, त्या संस्कृतीतील राजकारण प्रणालींची प्रगती आणि लष्करी सामथ्र्यातील प्रगती. 

अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातील जग हे बहुतांशी ब्रिटिश आणि युरोपियन टाचांखाली चिरडलेले वसाहतवादी जग होते. जगातील इतर संस्कृतींना नामशेष करीत करीत या वर्चस्ववादी संस्कृतींनी जगभर आपले जाळे पसरवायला सुरुवात केलेली होती. त्यांच्या युरोपियन संस्कारांना जे जे काही म्हणून ‘परके’, ‘वेगळे’, ‘न कळणारे’ असे दिसले, वाटले ते सर्व ‘मागासलेले’ या सदरात जमा केले गेले. 

युरोप सोडून इतर सर्व जग वरील सर्व निकष वापरता ‘अगदीच अप्रगत किंवा उत्क्रांत न झालेले’ असे असल्यामुळे हर्बर्ट महाशयांनी त्यांचा स्वत:चा असा सांस्कृतिक उत्क्रांतीवाद मांडला. या थिअरीनुसार युरोपियन हा एकच वंश ‘जगायला लायक’ असा ठरवला गेला. ‘किल ऑर बी किल्ड’ म्हणजे ‘ठार मारा, नपेक्षा मारले जा’ हे युरोपियन संस्कृतीचे सूत्र ठरविले गेले. 

बिचा:या डार्विनने अनेक शास्त्रीय प्रयोगाअंती निष्कर्ष काढला होता - ‘सव्र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ - म्हणजे ज्या प्रजाती सबळ, सक्षम असतील, त्याच जगायला लायक ठरतील. जीवशास्त्रतील डार्विन यांच्या या प्रयोगांचे निष्कर्ष सरसकट सांस्कृतिक वंशशास्त्रला लावले जातील अशी बिचा:या डार्विन यांना कल्पनाही आली नसेल.

परंतु असे झाले खरे. ‘आमची संस्कृती श्रेष्ठ आहे’ हे सांगण्याचे आणि ते इतरांच्या मनावर ठसवण्याचे कार्य हे आज फार बेमालुमपणो करावे लागते. 

 आज जगावर आपला सांस्कृतिक वरचष्मा स्थापन करण्यासाठी वर्चस्ववादी राष्ट्रांना वेगळी आखणी करणो भाग पडत आहे. त्यासाठी प्रचंड पैसे गुंतवले जात आहेत. 

या आखणीतील पहिली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक संस्कृतीतील विद्रोही गटांना आपल्या पंखाखाली घेणो. त्यांच्यावर पुरस्कारांची खैरात करणो. त्यांचे जगभराचे दौरे स्पॉन्सर करणो. त्यायोगे समाजातले विद्रोही सूर सतत खदखदत ठेवणो. 

स्वत:च्या संस्कृतीशी असलेली त्यांची नाळ जितक्या लवकर तुटेल तितके चांगले. मांजा तुटलेला पतंग काहीकाळ अधांतरी दिशाहीन तरंगतो आणि मग तो एकतर कापणा:याच्या मुठीत येतो नाहीतर काटेरी झाडांवर पडून आपोआप फाटून जातो.

प्रत्येक संस्कृतीतील विद्रोही आणि फुटीरतावादी वृत्तींना एकीकडे खतपाणी घालायचे आणि त्याचवेळी दुसरीकडे ‘तुमची संस्कृती कशी मागासलेली’ असे बहुसंख्य मनांवर ठसवत राहायचे’ 

- हा पाश्चात्त्य वर्चस्ववादी विचारांचा अगदी जुना खेळ आहे. त्यामुळे इतर संस्कृतींचे खच्चीकरण तर होतेच; पण त्याचबरोबर त्यांच्या स्वत:च्या संस्कृतीचा इगो किंवा आत्मभान सतत फुलारण्याचे काम होत राहते.

गोष्ट म्हटली तर जुनी, म्हटली तर अलीकडची आहे. 

काळ 192क् ते 1926. एका युरोपियन शहराच्या भिंतींवर असंख्य जाहिरातपत्रके चिकटवलेली असत. त्यावरचे शब्द होते- ‘इंडियन्स इन् द झू’. त्या शहराच्या प्राणिसंग्रहालयात गवताच्या झोपडय़ा उभारल्या होत्या. दक्षिण भारतातून आणलेले आदिवासी हे त्यातले जणू प्राणी. ते झाडांवर चढून दाखवत, पुंगी वाजवून सापाला डोलावून दाखवत. मधेच नृत्ये करत. युरोपियन ‘पुढारलेले’ आबालवृद्ध या प्राणिसंग्रहालयाला भेट देत. आणि या ‘मागासलेल्या’ भारतीय वंशाकडे तुच्छतेने आणि अचंब्याने पाहत. 

या युरोपियन राजधानीच्या शहरात शिकणा:या वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि ए.सी.एन. नंबीयार या बहाद्दर भारतीय विद्याथ्र्यानी तेथील प्रसारमाध्यमांमधे तडाखेबंद लिखाण करून 192क् पासून चाललेला हा प्रकार बंद पाडला. 

त्या उभयतानी लेखणी वापरली. इतरेजन बॉम्ब आणि बंदुका वापरतात. सांस्कृतिक नाळ तुटू न देण्याची पोटतिडीक तेवढी दोनही मार्गात सामायिक म्हणायची. 

म्हणून तर ठिकठिकाणच्या संस्कृतीतील लोकांची सांस्कृतिक नाळ कापणो हे  ‘सॉफ्टपॉवर’च्या भात्यातले आणखी एक महत्त्वपूर्ण अस्त्र मानले जाते.

 

महत्त्वाची अस्त्रे 

जसे नेशनचे ब्रॅँडिंग तसे संस्कृतींचेही ब्रॅँडिंग कटाक्षाने केले गेले आहे. अरब जगातील ज्ञानाला तुच्छ लेखले गेले. अरबी संस्कृतीला तुच्छ लेखले गेले. आफ्रिका, पूर्वेकडील संस्कृती, रेड इंडियन्सची संस्कृती, भारतीय संस्कृती - असे अगदी कोणीही या ‘सांस्कृतिक उत्क्रांतीवादातून’ सुटले नाही. युरोपियन संस्कृतीने ‘मागासलेले’ म्हणून भाळी मारून ठेवलेली मेख आज मात्र अनेक संस्कृतींना सहन होईनाशी झालेली आहे.  त्यामुळे आगामी काळात ‘सांस्कृतिक केंद्रे’, ‘संस्कृती प्रचार करणा:या संस्था’, ‘आंतरसांस्कृतिक देवाण-घेवाण केंद्रे’ ही सॉफ्ट पॉवरच्या अस्त्रगारातील सर्वात महत्त्वाची अस्त्रे असणार आहेत.

वैशाली करमरकर

 


गारूड्याचा खेळ

दंडुकेशाहीची हार्ड पॉवर आणि लोकांच्या मनातील आकर्षणाची सॉफ्ट पॉवर यांचं कॉकटेल काहीही करून लोकांना प्यायला लावणारी वसाहतवादी ‘अण्वस्त्रांची’ अरेरावी.

आपल्या लोभस रूपात विश्‍वभरातल्या मानवी मनाला स्वत:कडे आकर्षित करते ती सॉफ्ट पॉवर. महागड्या खाद्यपेयांचे, विशिष्ट जीवनशैलीचे आकर्षण इत्यादी बाबी म्हणजे या सॉफ्ट पॉवरच्या खेळातल्या चिल्लर गोष्टी. जणू गल्लीबोळात रंगलेला विटीदांडूचा खेळ. सॉफ्ट पॉवरच्या  खेळाचा खरा सामना रंगतो तो आंतरराष्ट्रीय राजकारणात.

सर्व जग म्हणजे एक गाव मानलं तर या गावातही कोणी पुढारी असतात, कोणी श्रीमंत असतात, कोणी मध्यमवर्गीय, तर कोणी मागासवर्गीय. प्रत्येकाला आपल्या इज्जतीची आणि इभ्रतीची काळजी असते. गावात आपली प्रतिमा शक्यतो चांगली राहील याची धडपड करावी लागते. श्रीमंतांना त्यांच्या शिवारात काम करायला मजूर हवे असतात. मध्यमवर्गीयांना केरवारे-स्वयंपाक इ. कामाला मजूर हवे असतात. शिवाय शेजार-पाजारही नीट बांधायचा असतो. एक संकटकाळची तरतूद म्हणून हे आवश्यक असते. ग्लोबल व्हिलेजमधल्या मागासवर्गीय देशांना तर त्यांच्या रोजच्या भाकरतुकड्यांसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कर्जपुरवठा हवा असतो. थोडक्यात आपल्या राष्ट्राकडे आणि संस्कृतीकडे जगातल्या सगळ्यांनी मान उंचावून बघणे हे अत्यंत फायदेशीर असते. त्यात मुत्सद्देगिरी असते. कारण इथे स्वत:बद्दल नुसते आकर्षण निर्माण करून सॉफ्ट पॉवरची गोष्ट थांबत नाही, तर या आकर्षणाचा उपयोग करून स्वत:चे ईप्सित आणि स्वत:चा स्वार्थ बेमालूमपणे साधायचा असतो.

एकोणिसाव्या शतकातील युरोपीयन वसाहतवादी राष्ट्रांच्या लक्षात ही गोष्ट सर्वप्रथम आली. यात अग्रक्रम इंग्रज आणि फ्रेंच लोकांना द्यावा लागेल. इ.स. १८३५ सालचे लॉर्ड मेकॉले यांचे ब्रिटिश पार्लमेंटमधले भाषण सर्वांना माहितीच आहे. ते जे म्हणाले त्याचा सारांश असा, ‘‘भारतीयांची संस्कृती आपल्यापेक्षा फारच उच्च आहे. त्यांच्यावर अधिसत्ता गाजवायची असेल तर प्रथम भारतीय भाषा आणि भारतीय संस्कृती दस्तूरखुद्द भारतीयांना हिणकस वाटेल अशी तजवीज केली पाहिजे. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी संस्कृती याकडे त्यांनी कायम आशाळभूत आणि लोलूप नजरेने पाहिले पाहिजे, तरच आपण या खंडप्राय देशाला आपल्या टाचेखाली आणू शकू.’’ लॉर्ड मेकॉलेचे शब्द तंतोतंत खरे झाले. बाळगुटीतल्या अफूच्या वळशाने बेमालूम काम केले. अलेक्झांडर द ग्रेटपासून ते तुर्की-मोगल वंशांची भारतावरील आक्रमणे सशस्त्र होती. घोडदळे, पायदळे, तोफा, सैनिकांच्या लाटा अशी. या अशा शस्त्रसज्ज आक्रमणांना नाव पडले हार्ड पॉवर. लष्करी सार्मथ्य म्हणजे हार्ड पॉवर. कारण ती दिसते. मोजता येते. त्याचा गडगडाट जगभर ऐकायला येतो. त्यात स्वत:च्या विनाशाची भीती असते. त्यामुळे या दुनियेच्या गावगाड्यात दहशतीचे वातावरण तयार होते.

फ्रेंच साम्राज्यानेदेखील हा सॉफ्ट पॉवरचा महिमा फार पूर्वीपासून ओळखला. प्रथम एखाद्या समूहाची भाषा आणि संस्कृती नष्ट करायची. त्यायोगे जेत्याच्या संस्कृतीबद्दल आकर्षण निर्माण करायचे. जिंकलेल्या समूहाने आपले सर्वतोपरी आणि हिरिरीने अंधानुकरण करावे याची पूर्ण तजवीज करायची अशी ही चाणाक्ष आखणी. फ्रेंचांनी १८८३ सालापासून फ्रेंच भाषेच्या आणि फ्रेंच संस्कृतीच्या प्रसारासाठी जगभर हे जाळे पसरवायला सुरुवात केली. आजही चीनसह इतर अनेक बलाढय़ देश आपल्या वार्षिक अंदाजपत्रकातील ५ ते ८ टक्के इतकी भक्कम तरतूद जगात आपापल्या भाषेचा आणि संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी वापरतात. भाषा आणि संस्कृतीप्रसार हे ‘सॉफ्ट पॉवर’ या म्यानातले एक महत्त्वाचे अस्र आहे. आणि तीही लष्करावरील खर्चासारखीच मोठी खर्चिक बाब आहे.

नुसती खर्चिक नव्हे तर ती सतत मोजत राहणे हेही जिकिरीचे काम आहे. एखाद्या रुग्णाचा तासातासाने ताप मोजावा तसे ‘‘जगात माझ्या देशाची प्रतिमा इतरांना पुरेशी आकर्षित करते आहे की नाही’’ याचे मोजमाप मुत्सद्दी राष्ट्रे सतत करत असतात. त्यासाठी वारंवार जगभर सर्वेक्षणे होतात. त्यावरही अफाट खर्च केला जातो.

अमेरिकेचे उदाहरण घ्या. दुसर्‍या महायुद्धानंतर सर्व जग दोन गटात विभागले गेले. एकीकडे सोव्हिएट युनियनप्रणीत कम्युनिस्ट जग, तर दुसर्‍या गटात लोकशाहीप्रणीत अमेरिकेचे जग त्यांच्यामधे होता प्रचंड अभेद्द असा पोलादी पडदा. पण तो भेदून चोरून-मारून कम्युनिस्ट जग अमेरिकन संगीत ऐकत राहिले, अमेरिकन चित्रपट पहात राहिले. त्यातील स्वातंत्र्याच्या कल्पनांवर मोहित होत राहिले. अमेरिकन स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा डोळ्यापुढे धरून टीयानमेन चौकात जमलेल्या २000 तरुण चिनी विद्यार्थ्यांचे रक्त त्यासाठी सांडले. तेथील सरकारे काहीही म्हणत असली तरी कम्युनिस्ट जगातले लोकमानस विलक्षण ओढीने अमेरिकेतल्या टोकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कांचनमृगापाठी धावत राहिले. अमेरिकन संस्कृतीच्या नेमक्या प्रसिद्धीतंत्राचा हा मोठा विजय होता. १९९१ साली झालेली गल्फवॉर सर्व जगाने आपापल्या गुबगुबीत सोफ्यावर शांतपणे बसून पाहिली. अमेरिकेची प्रतिमा अधिक उंचावर गेली. २00३साली त्याच गुर्मीत अमेरिकेने हार्ड पॉवर वापरून इराकवर हल्ला चढवला. यूनोच्या दुसर्‍या ठरावाची त्याने वाटही पाहिली नाही. सर्व जगाचे जनमत आपल्याच बाजूचे आहे असा फाजील आत्मविश्‍वास नडला. सॉफ्ट पॉवर मोजण्याच्या निर्देशांकात अमेरिकेचे स्थान प्रचंड ढासळले. थोडक्यात जगातील लोक पूर्वीसारख्या हपापल्या नजरेने अमेरिकेकडे पाहिनाशी झाली. अमेरिकेची प्रतिमा डागाळली गेली.

अमेरिकन सरकारचे सल्लागार जोजेफने यांनी अमेरिकन सरकारला खडबडून जाग आणण्यासाठी ‘सॉफ्ट पॉवर’ हा शब्द प्रथम वापरला, रूढ केला. लष्करी सार्मथ्याच्या इतकीच ‘सॉफ्ट पॉवर’ या अस्त्रासाठी अमेरिकन सरकारने खर्चाची आणि मनुष्यबळाची तजवीज करण्याची वेळ आली आहे, हे अमेरिकन सरकारला बजावले.

एकोणिसाव्या शतकापासून युरोपियन वसाहतवाद्यांनी वापरलेले हे अस्र किती प्रभावी आहे त्याची मांडणी करून दाखवली. इंटरनेटमुळे ‘युद्ध’ या संकल्पनेचेही जणू खासगीकरण झाले आहे. फक्त दंडुकेशाहीने आणि आण्विक अस्त्रांनी जग जिंकू पाहणे आज केवळ अशक्य आहे. म्हणून आगामी काळात हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर याचे आकर्षक कॉकटेल साधणे यातच राष्ट्रांच्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे असे जोजेफने यांचे सततचे प्रतिपादन आहे.

कसे असते हे कॉकटेल? त्यासाठी लेखातील कल्पनाचित्र पुरेसे बोलके आहे. पार्श्‍वभूमीला वाळवंटातली युद्धभूमी आहे. तहानलेल्या बालकासाठी या सैनिकाच्या हातात पाण्याची नव्हे तर कोलासदृश पेयाची बाटली आहे. सैनिकाकडे नखशिखान्त शस्त्रबळ आहे. त्यामुळे हे बालक पेयाकडे आकर्षित झाले असले तरी त्याची देहबोली दबलेली आहे. पेय पिण्यातले त्याचे ते हपापलेपण नजेरतून सुटत नाही. अगदी लहान वयापासून जेत्याबद्दल ‘गुड-विल’ म्हणजे लोकप्रियता मिळवते ती सॉफ्ट पॉवर. याच पोराने मोठे झाल्यावर अरेरावी करायला सुरुवात केली तर उगारलेली एके ४७ म्हणजे हार्ड पॉवर!


‘आशाळभूत आणि लोलूप’

 

एखाद्या समूहाची भाषा आणि संस्कृती अगोदर नष्ट करायची, आपल्याच संस्कृती आणि भाषेबद्दल त्यांच्या मनात हिणकस भावना तयार होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना जेत्यांच्या संस्कृतीबद्दल लोकांच्या मनात आकर्षण निर्माण करायचे. त्या लोकांनी सतत आपल्याकडे आशाळभूत आणि लोलूप नजरेनेच पाहावे यासाठी असतील, नसतील ते सारे मार्ग अवलंबायचे! - सॉफ्ट पॉवरची ही शक्ती सर्वात प्रथम ओळखली ती फ्रेंचांनी.

जगभरातले बलाढय़ देश या अस्राचा वापर करताना कोट्यवधी डॉलर ओततात. त्यांच्यासाठी ती लष्करी खर्चाइतकीच अत्यावश्यक बाब आहे!

 

  आपली मातृभाषा ‘गावंढळ’ कशी?

 

सॉफ्ट पॉवर ही साळसूद असते. ती भीतीवर चालत नाही तर आकर्षणावर चालते. ती हवेसारखी असते. सर्वत्र असते, पण चिमटीत पकडून दाखवता येत नाही. लष्करी सामार्थ्य वापरताना त्याला काळाची चौकट असते. ती वर्षात, महिन्यात मोजता येते. अमुक एक युद्ध किती वर्षे चालले हे सर्वांना ठाऊक होऊ शकते. सॉफ्ट पॉवर हे अस्र मात्र अनेक शतके सातत्याने वापरावे लागते, तेव्हा कुठे त्याचे इष्ट परिणाम दिसायला लागतात. आज आपण भारतीय एकमुखाने संस्कृतला मृत भाषा ठरवतो. इंग्रजी मडमेला दिवाणखाण्यात न बसवता पार अंतर्गृहात प्रवेश देतो. मराठी किंवा इतर भारतीय मातृभाषांमध्ये बोलले तर ‘मला गावंढळ म्हणतील’ असे समजतो, प्राचीन भारतात कुठलीही ज्ञान परंपरा नव्हती यावर आपल्या सर्वांचा ठाम विश्‍वास आहे. थोडक्यात ‘हिंदू पंडितांची बाष्कळ बडबड’ असे मेकॉले आणि जेम्स मिल या द्वयींनी उगाळून चाखलेले शब्द आपणच आपल्याबाबतीत उच्चारत आहोत.


 वैशाली करमरकर