December 30, 2010

ई साहित्य संमेलनं

ई-संमेलन कार्यक्रम पत्रिका

आपली साहित्य संमेलनं गाजतात ती साहित्येतर कारणांनीच. ज्या विषयांवर संमेलनांमध्ये चर्चा होतात, त्यांचे पडसाद संमेलनाच्या मंडपाबाहेर उमटल्याचे फारसे ऐकू येत नाही. म्हणूनच साहित्यातील समकालीन मुद्‌द्यांवर निर्भिड चर्चा घडावी आणि अशा विषयांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी युनिक फीचर्स (http://uniquefeatures.in/) आपल्या नव्या वेबसाइटवर ३१ डिसेंबर २०१० ते तीन जानेवारी २०११ दरम्यान पहिलं अनुभव ई-साहित्य संमेलन भरवत आहे.
या पहिल्या ऑनलाइन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी.

या संमेलनाचे उद्घाटन ३० डिसेंबर २०१० रोजी संध्याकाळी ५ वाजता पत्रकार संघ येथे होत आहे. यावेळी रत्नाकर मतकरी यांच्यासोबत एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत हेदेखील उपस्थित असतील.
परिसंवाद, मुलाखती, कविकट्टा अशी मुख्य संमेलनातील सगळी वैशिष्ट्ये या ई-संमेलनातही असतील. अनेक ज्येष्ठ लेखकांनी समकालीन साहित्यातील कळीच्या मुद्‌द्यांवर थेट भूमिका घेतली आहे. संमेलनाध्यक्षांचे भाषण आणि तसेच काही साहित्यिकांचे विचार व्हिडिओमधूनही पाहता येतील.

अशी आहे या संमेलनाची कार्यक्रमपत्रिका.

शुक्रवार, ३१ डिसेंबर २०१०
रत्नाकर मतकरी यांचे अध्यक्षीय भाषण

परिसंवाद
साहित्येतर दबावापुढे लेखकांनी शरणागती पत्करली आहे.

सहभाग- रंगनाथ पठारे, दीनानाथ मनोहर, अवधूत परळकर
समारोप- वसंत आबाजी डहाके

ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांची प्रशांत खुंटे यांनी घेतलेली मुलाखत

शनिवार, एक जानेवारी २०११

परिसंवाद
इंटरनेटमुळे साहित्याचा पैस वाढतो आहे.

सहभाग- कविता महाजन, अरूण भालेराव, प्रसाद शिरगावकर
समारोप- अच्युत गोडबोले

कथाकार सानिया यांच्याशी संजय भास्कर जोशी यांनी
मारलेल्या दिलखुलास गप्पा

रविवार, दोन जानेवारी २०११
परिसंवाद
वर्तमानपत्रांनी साहित्याला बेदखल केले आहे.

सहभाग- अरूण खोरे, शंकर सारडा, जयदेव डोळे
समारोप- अरूण साधू

नाट्यनिर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवणारी नाटककार शफाअत खान यांची रवींद्र पाथरे यांनी घेतलेली मुलाखत.

सोमवार, तीन जानेवारी २०११
परिसंवाद
संमेलनाला मिळणारा एकगठ्ठा पैसा ही चिंतेची बाब आहे का ?

सहभाग- निळू दामले, संजय जोशी, अविनाश कदम
समारोप- सदा डुंबरे

कविता - निमंत्रितांच्या आणि तुमच्या-आमच्यादेखील

कवी कट्‌ट्यावर तिन्ही दिवस खास वेबसाइटसाठी लिहिलेल्या निमंत्रित कवींच्या कविता वाचता येतील. त्यात सतीश काळसेकर, दासू वैद्य, आसावरी
काकडे, सतीश सोळांकूरकर, वर्जेश सोळंकी, श्रीकांत देशमुख, संगीता बर्वे, प्रशांत असनारे, प्रफुल्ल शिलेदार, अंजली कुलकर्णी, बालाजी इंगळे अशा
आजच्या आघाडीच्या कवी-कवयित्रींच्या कवितांचा आस्वाद या ई-संमेलनात रसिकांना घेता येईल. एवढेच नव्हे तर वाचकांना, नवोदित कवींना या
वेबसाइटवर आपल्या कविता प्रकाशित करता येतील, अशीही सोय आम्ही केली आहे.

तुम्हीही या ई- साहित्य संमेलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा.